व्हिडिओ

Amit Shah | Sanjay Raut | खासदार संजय राऊतांची अमित शाहांवर घणाघाती टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे. अमित शाहांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण केलं आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे. अमित शाहांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण केलं आहे. महाराष्ट्राला कमजोर करून उद्योग गुजरातला नेले. तर गृहमंत्र्यांचा कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राज्यातील जनता अमित शाहांना शत्रू मानते असं महत्त्वाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर एक दिवस लालबागचा राजा ही गुजरातला नेतील असा टोला संजय राऊत यांनी अमित शाहा यांच्यावर लगावला आहे.

यावर संजय राऊत म्हणाले की, अमित शाहा यांच्यावरून महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत ते कमजोर गृहमंत्री आहेत. या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पुर्णपणे धासळलेली आहे. जम्मु कश्मिर असेल, मणिपुर असेल इतर भाग असतील या गृहमंत्र्यांचं देशाताल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी लुटमार मुंबई लुटन आणि लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं, शिवसेना राष्ट्रवादी पक्षासारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करतात अशाप्रकारची काम त्यांनी केली.

लालबागच्या राज्याच्या दर्शनात येत आहेत येऊ द्या मला तर सारखी भिती वाटते ज्याप्रकारे मुंबईतले अनेक उद्योग त्यालोकांनी गुजरातमध्ये पळवले अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे हे लोक एक दिवस लालबागचा राजा पण पळवून न्हेनार नाही ना, हे लोक काही ही करू शकतात. असं संजय राऊत अमित शाहा यांच्यावर टीका करतं म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू