राज्यातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक 2 टप्प्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे. 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच याबाबत घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे दिवाळी नंतरच आता राज्यात मतदान प्रक्रिया पार पडेल अशी शक्यता आहे.