औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलून ते रत्नपुर करण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार संजय केनेकर यांनी केली असून ऐतिहासिक दौलताबादचे नाव देवगिरी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी या MIM पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लाटल्या असून यामुळे ओवैसी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार संजय केनेकर यांनी केला.