मुंबईतील दोन जागेंवरून काँग्रेमध्ये संभ्रम असल्याची माहिती आहे. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईवरुन संभ्रम असल्याचे कळतंय. उत्तर मध्य मुंबईमध्ये नसीम खान यांच्या नावाची चर्चा आहे. पण नसीम खान यांच्या नावावर एकमत नाही आहे. तर उत्तर मुंबईमधून वर्षा गायकवाड यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याची समोर येत आहे.
त्यामुळे मुंबईमधील 6 मतदारसंघापैकी ज्या दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत त्यापैकी आता कोणाला इथे उमेदवारी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. मात्र, या दोन जागांवर उमेदवार कोण द्यायचा हा प्रश्न काँग्रेससमोर आहे.