व्हिडिओ

Hingoli: दुष्काळी स्थितीमुळे हिंगोलीतील शेतकरी हतबल

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली आहे. दुष्काळी स्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आपलं रक्तच विक्रीला काढलं आहे. आमचं रक्त विकत घ्या, पण अन्नधान्य द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने कापूस, तूर, सोयाबीन पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान होऊनही पीक विमा मिळाला नसल्याने हिंगोलीच्या तपोवन येथील शेतकऱ्यांनी स्वतःचं रक्त विक्रीला काढल आहे आमचे रक्त घ्या पण आम्हाला खायला अन्नधान्य दया अशा प्रकारचे स्वतःला पोस्टर लावले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा