पंजाबमध्ये आज शेकऱ्यांचं रेलरोको आहे. शेतकरी 4 तास रेल्वे रोखणार असल्याची माहिती आहे. शेतकरी संघटनांचा रेलरोकोचा इशारा आता देण्यात आला आहे. दुपारी 12 ते 4 रेल्वे रोखून धरण्यात येणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आता शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. विविध मागण्यांसाठी पंजाबमध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. याआधीही सरकारकडून हे आंदोलन हा मोर्चा रोकण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या तरीही शेतकऱ्यांचं निर्भर ठाम आहे.