गौतम अदानीने सरकारच्या एका सहकाऱ्याची खात्यात 150 कोटी रुपये टाकल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. नाना पटोलेंच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झालीय. अदानीने नेमके कोणाच्या खात्यात पैसे टाकले आणि का टाकले असा सवाल या निमित्ताने पुढे येतोय. यावेळी नाना पटोलेंनी त्याचा उलगडा करू असा गंभीर इशाराही दिलाय.