धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणासाठी पन्नास दिवसांची मुदत मागून घेतली होती त्याचं काय झालं, असा सवाल गोपीचंद पडखळकरांनी विचारला आहे. पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करुन दिली आहे. यासोबतच आश्वासन पूर्ण करा नाहीतर आंदोलनाला तयार राहा असा, इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.