व्हिडिओ

jayantpatil | '...तर सर्व योजना बंद होतील', मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा

महायुतीच्या योजनांवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे.

Published by : Team Lokshahi

महायुतीच्या योजनांवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे. सरकारकडे योजना नसताना योजना जाहीर करतात. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे.

यावर जयंत पाटील म्हणाले की, केलेल्या योजनांवर पैसे नाही म्हणून सरकारने रिजर्व बॅंक ऑफ इंडियाला एक पत्र दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने हे पत्र देत विनंती केली आहे की, सव्वा लाख कोटी रुपयांच डिसेंबरपर्यंत खर्च करण्यासाठी पैसे द्या. 8 लाख कोटी रुपये सरकारवर कर्ज आहे तर त्यात अजून सव्वा लाख कोटी रुपये डिसेंबर अखेरपर्यंत मागितलेले आहेत.

या महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर जाताना ही लोक 9-10 लाख कोटीपर्यंत पुढे घेऊन जायच्या तयारीत आहेत. जे लाडक नव्हत ते सगळ त्यांना लाडक वाटायला लागलं आहे. ते तुमच्यासाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे. इलेक्शन झाल्यानंतर हे लोक या योजनांच काय करतील काय सांगू शकत नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : आतापर्यंतची सर्वाधिक SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं