२२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यासोबतच २२ जानेवारीला संध्याकाळी घरामध्ये रामज्योती प्रज्वलित करा, असं आव्हान पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं आहे. भाजप सरकार गरिबांना समर्पित आहे. देशामध्ये चार कोटीपेक्षा अधिक गरिबांना घर आहेत आणि देशात सुशासन, इमानदारीचं राज्य असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.