छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षणाच्या विरोधकांनी ते कसे दिले जाणार असा प्रश्न सरकारला उपस्थित करत आता या आरक्षणाच्या लढाईच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रकृती खालवली असताना सुद्धा जरांगे पाटील म्हणाले, याचिका जरी दाखल झाली तरी आरक्षण मिळवून देणारच, कोणत्याही परिस्थितीत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालच पाहिजे. मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्यांना मी सोडणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.