राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्याचा राहुल गांधींनी चांगलाच समाचार घेतलाय. दिल्लीत काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी एक भाषण केलं. इंदिरा भवनच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधींनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.