school restart team lokshahi
व्हिडिओ

मुंबई मनपा शाळांना 'अच्छे दिन', खाजगीकडून मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा

मुंबई महानगरपालिकेच्या मराठी भाषिक शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शाळा बंद पडू लागल्या होत्या...

Published by : Team Lokshahi

मुंबई महानगरपालिकेच्या मराठी भाषिक शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शाळा बंद पडू लागल्या. यानंतर तत्कालीन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शाळांच्या दर्जा सुधारण्याकडे लक्ष दिले. सरकारी शाळांमध्ये खाजगी शाळेंप्रमाणे शिक्षण देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले. यामुळे खाजगी शाळांमधून मनपाच्या शाळेत विद्यार्थी प्रवेश घेऊ लागले आहे. यावर्षी शाळा प्रवेशासाठी दुप्पट अर्ज आल्याने सीबीएसई शाळेंमध्ये लॉटरी काढून प्रवेश द्यावा लागला.

अशा आहेत मनपाच्या शाळा

मुंबई पालिकेच्या 1 हजार 150 शाळा

मुंबई पालिकेच्या 467 स्वमालकीच्या शालेय इमारती

मनपा शाळेत तीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी

2021-22 मध्ये 22 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

2022-23 मध्ये 1 लाख दोन हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

107 शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

काय केला मनपाने बदल

पालकांचा कल पाहता इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुरवात

शाळांमधील शिक्षकांना इंग्रजीतून शिकवण्याचे प्रशिक्षण

सर्व शाळांना समान सामाजिक दर्जा, नावही मुंबई पब्लिक स्कूल

शाळांमध्ये चांगले बेंच, विद्यार्थ्यांना आवडणारे वातावरण

शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण

दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा

माटुंगाच्या शाळेत केंब्रिज विद्यापीठाशी संबधित उपक्रम

काही वर्षांपुर्वी विद्यार्थी नसल्याने मनपाच्या शाळा बंद कराव्या लागत होत्या. आता एका जागेसाठी तीन-चार विद्यार्थ्यांचे अर्ज येत आहे. मुंबई मनपाने काळाची गरज ओळखून 11 शाळांना सीबीएसई तर एका शाळेला आयसीएसई बोर्डाचा दर्जा दिला. या 12 शाळांमधील 3849 जागांसाठी 9635 अर्ज आले. यामुळे लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागला. मानसिकता बदलली तर काहीही शक्य आहे, हे मुंबई मनपाच्या शालेय प्रशासन विभागाने दाखवून दिले…

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा