व्हिडिओ

'Rahul Gandhi इंडिया' लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींचा दावा

Published by : Team Lokshahi

देशात इंडियाची स्थिती भक्कम आहे. जागावाटपाचा मुद्दाही लवकर सोडवला जाईल. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच राम मंदिर सोहळ्याला भाजपसह संघाने पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. राम मंदिर संघ आणि भाजपचा कार्यक्रम बनलाय असा हल्लाबोल राहुल गांधी यानी केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गाधींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. हा संघ आणि भाजपचा कार्यक्रम बनला आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले, असे ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार राज ठाकरे यांची भेट

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 15 जणांचा मृत्यू

मुंबईतील स्थानिक अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश

घाटकोपरमध्ये बचावकार्यादरम्यान होर्डिंगचा लोखंडी सांगडा उचलताना पेट्रोल पंपाला आग

Bhavesh Bhide : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप