व्हिडिओ

Rajkot Fort | Sanjay Raut | राजकोट राड्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

राजकोट राड्यावरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कोकणची संस्कृती मातीमोल होत आहे असे राऊत म्हणाले.

Published by : Dhanshree Shintre

राजकोट राड्यावरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कोकणची संस्कृती मातीमोल होत आहे असे राऊत म्हणाले. तर पोलिसांच्या वर्दीचाही मान ठेवला जात नाही. सिंधुदुर्गकरांना आता लोकसभेतील चूक लक्षात आली असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि नाव न घेता राणे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी आज राजकोट किल्ल्यावर भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे जनतेला आता कळलं असेल की त्यांनी लोकसभा निवडणूकीत काय चूक केली. त्यांचं स्वातंत्र्य, त्यांनी प्रतिष्ठा, त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसलो आहे आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एकदा मातीमोल होताना मला दिसतंय. असं आहे का नावं कशाला घ्यायची, नावं घ्यायची काही गरज नाहीये. ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं की गृहमंत्र्यांनी सांगावं की हो ही माझी संस्कृती आहे असं संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा