सांगली : ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आठ दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखाना स्थळावर संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारखानदारांची बैठक घेऊन आठ दिवसांत तोडगा काढण्याची मुदत दिली होती. ती मुदत आज संपली असूनही तोडगा न निघाल्याने संघटनेने काटा बंद आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.