व्हिडिओ

Team India : मुंबईत निघणार टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक ; टीमच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर

29 जूनला झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप पटकावले. बार्बाडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरिल चक्रीवादळामुळे टीम इंडियाला मायदेशी परतण्यास विलंब झाला आणि अखेर टीम इंडियाचे पाच दिवसांनी मायदेशात आगमन होणार आहे.

Published by : Team Lokshahi

29 जूनला झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप पटकावले. बार्बाडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरिल चक्रीवादळामुळे टीम इंडियाला मायदेशी परतण्यास विलंब झाला आणि अखेर टीम इंडियाचे पाच दिवसांनी मायदेशात आगमन होणार आहे.

याच पार्श्वभुमीवर जग्गजेतेपदाचा आज मायानगरीत जल्लोष होणार आहे. मुंबईमध्ये आज टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक संध्याकाळी मरीन ड्राइव, नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी काढण्यात योणार आहे. तर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या सत्कार देखील करण्यात येणारआहे.

दुपारी 4 वाजता टीम इंडिया ही दिल्लीतून मुंबईत येणार आहे. यासाठी मुंबईत टीम इंडियाच्या स्वागताची मोठ्या जल्लोषात तयारी करण्यात आली आहे. तसेच स्वागतादरम्यान सुरक्षेची देखील काळजी घेतली जाणार आहे. तर टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर झालेले पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा