CM मला तुमच्याशी बोलायचंय Team Lokshahi
व्हिडिओ

CM मला तुमच्याशी बोलायचंय : TET ineligible teachers : लाच देऊन पास झालेल्या शिक्षकांना कधी बडतर्फ करणार?

अपात्रच्या जागी पात्र शिक्षकांच्या नियुक्त्या कधी?

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019 मध्ये टीईटी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 16 हजार 592 परीक्षार्थीं पात्र झाले होते. प्रत्यक्षात पुणे सायबर पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर 7 हजार 800 परीक्षार्थी अपात्र होते. पण शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी आणि खासगी एजंट यांनी संगनमत करून, अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतले.

त्यानंतर त्यांना उत्तीर्ण करून पात्र ठरवले. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजीही झाली होती. साडेचार लाख परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. यातील अनेकांना लाच घेऊन पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आलाय आणि याच प्रकरणी सुपे यांना डिसेंबर 2021 मध्ये अटक झाली होती. या शिक्षकांची सेवा कधी समाप्त करणार, असा प्रश्न विचारण्यात येतोय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा