Bageshwar Baba 
व्हिडिओ

Bageshwar Dham Baba: कुंभमेळ्यातील मृतांना मोक्षप्राप्ती झाली, धीरेंद्र शास्त्रींचं विधान

बागेश्वर धाम बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृतांना मोक्षप्राप्ती झाल्याचे वादग्रस्त विधान केलं आहे.

Published by : Gayatri Pisekar

१३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला. महाकुंभमेळ्यात दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी येतात. पण, २९ जानेवारीला पहाटे १.३० वाजता गालबोट लावणारी घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविक संगमाकडे जात असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला तर ९० जण जखमी झाले आहेत. या घटनेवर बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय म्हणाले बागेश्वर बाबा?

'कुंभमेळ्यातील मृतांना मोक्ष प्राप्ती झाली असल्याचं बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. कुंभमेळ्यात 30 पेक्षा जास्त भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. यावरून कुंभमेळ्यातल्या व्यवस्थेबाबत प्रश्न उठवले जात आहेत. मात्र, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा