जास्त दिवस घोंगड भिजत ठेवलं तर वास मारतोच, असा घरचा आहेर उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणावरून उदयनराजे चांगले चिडले आहे. जास्त दिवस दुर्लक्ष केलं तर चीड येणारच, असंही उदयनराजे म्हणाले आहेत. तसेच, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी मंडल आयोग जाहीर केलं, त्यावेळेस सगळं केलं असतं तर हा विषय राहिलाच नसता, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला आहे.