पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला वारकरी पायी चालत येतात. हजारो वर्षांची ही परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे. वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोषाने वातावरण अगदी प्रसन्न होते. सर्व सुख-दुःखे विसरून वारकरी पांडुरंगाच्या ओढीने आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. सावळ्या विठुरायाचे मनमोहक रुप सर्वच जण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अधीर असतात. या आषाढी एकादशीला सुंदर मेसेजेसने आपल्या हिंतचिंतकांना शुभेच्छा द्या.