गणपती इतिहास

Ganpati Visarjan 2024 : गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात का विसर्जन करतात? जाणून घ्या...

गणेश विसर्जनाच्या दिवशी, भक्तगण गणपतीला ढोल-ताशाच्या गजरात निरोप देतात आणि त्याची मूर्ती पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करतात.

Published by : Dhanshree Shintre

गणेश विसर्जनाच्या दिवशी, भक्तगण गणपतीला ढोल-ताशाच्या गजरात निरोप देतात आणि त्याची मूर्ती पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करतात. या दिवशी बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. पण गणपती विसर्जन पाण्यात का केले जाते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? दहा दिवसांच्या पूजेनंतर गणपतीची मूर्ती पाण्यात का विसर्जित केली जाते?

पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की, महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत लिहिले आहे. महर्षी वेदव्यास यांनी सलग 10 दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी ही कथा 10 दिवस तंतोतंत लिहिली. 10 दिवसानंतर जेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणपतीला स्पर्श केला तेव्हा, त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरशः चटका लागला. त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले. तेव्हापासून असे मानले जाते की, गणपतीचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केले जाते.

भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव सुरू होतो. चतुर्दशी तिथीपर्यंत गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेश मूर्तीची स्थापना चतुर्थी तिथीला केली जाते आणि चतुर्दशी तिथीला बाप्पाचे विसर्जन केले जाते. या नऊ दिवसांना गणेश नवरात्र म्हणतात. असे मानले जाते की मूर्तीचे विसर्जन करून भगवान पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात. या दिवशी अनंत शुभ फळ मिळू शकतात. म्हणून या दिवसाला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप; 375 गावांमध्ये 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम राबवला

OnePlus Nord 5 : वनप्लसची नवी उत्पादने जागतिक बाजारपेठेत दाखल; स्मार्टफोनसह इअरबड्स, टॅबलेट, पॅड आणि स्मार्ट वॉच लाँच

Dhurandhar Film : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटात ‘राहुल गांधी’ नाव पाहून गोंधळ; जाणून 'घ्या' Fact Check

Teachers Protest : अधिवेशन संपेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात जमा होणार इतका पगार; गिरीश महाजन यांनी दिले आश्वासन