अध्यात्म-भविष्य

नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये? कारण वाचा

शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. लोक दुर्गा देवीची पूजा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये लसूण आणि कांद्याचा वापर वर्ज्य मानला जातो. नवरात्रीमध्ये लसूण आणि कांदा का सेवन करू नये.असे मानले जाते की, लसूण-कांदा सूडबुद्धीने येतो. ते अशुद्ध श्रेणीत मोडतात. त्याचे सेवन केल्याने अज्ञान वाढते. यामुळे वासना वाढते. त्यामुळे उपवासाच्या वेळी त्यांचे सेवन करणे वर्ज्य मानले जाते.

पूजा करताना मन शुद्ध असले पाहिजे. त्यामुळे सात्विक अन्न सेवन केले जाते. तुम्ही शुद्ध आणि प्रसन्न मनाने देवाची पूजा करा. पण कांदा-लसूण खाल्ल्याने मन अशुद्ध होते. असे मानले जाते. नवरात्रीमध्ये पवित्रता राखण्यासाठी लसूण-कांद्याचे सेवन करू नये. त्यांचे सेवन केल्याने व्यक्तीचे मन चंचल राहते. यामुळे माणूस सुख-विलासाकडे आकर्षित होतो. त्यामुळे उपवासात लसूण-कांदा कधीही खाऊ नये.

यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. शारदीय नवरात्रीपासून थंडीचा हंगाम सुरू होतो. अशा स्थितीत रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. यावेळी सात्विक आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.

वरील सर्व बाबी लोकशाही न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकशाही न्यूज चॅनेल कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा