Delhi Capitals 
IPL T20 2021

IPL 2022: पंतची दिल्ली कॅपिटल्स जिंकणार IPL ? सुनील गावस्कर यांची पहिली प्रतिक्रिया…

Published by : Vikrant Shinde

IPL चा १५ (IPL 15) वा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील पंडित (IPL Experts) आपापले अंदाज वर्तवत आहेत. तसेच विजेतेपदासाठी जाणाऱ्या संघा बाबतीत देखील अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशातच भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सुद्धा आपला अंदाज वर्तवला आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सकडे पाहता हा संघ विजेतेपदावर आपले नाव करू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या दोन मोसमा पासून हा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. २०२० साली हा संघ आयपीएल च्या फायनल मध्ये पोहोचला होता. त्यावेळी या संघाला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून हार पत्करावी लागली होती. तसेच मागच्या वर्षी २०२१ साली हा संघ प्ले ऑफ (Play Offs) मध्ये आला होता. गेल्या १४ सीझनमध्ये या संघाला एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही.

स्पोर्ट्स तकशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, "गेल्या मोसमात रिषभ पंतला कर्णधार म्हणून मिळालेला अनुभव हा त्याला या मोसमात खूप आत्मविश्वास देईल. गेल्या दीड महिन्यापासून भारतीय संघासाठी त्याने चांगला खेळ केला आहे, याचा त्याला आयपीएलमध्ये नक्कीच फायदा होईल." गावस्कर पुढे म्हणाले, "त्याने या मोसमात ज्या प्रकारच्या खेळाडूंची निवड केली आहे, ते खरोखरच मजबूत आहेत." त्यामुळे यंदा ते ट्रॉफी वर त्यांचं नाव कोरण्याची दाट शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट