राज्यपाल शिवेनरीवर चालत गेलेत, हिम्मत असेल तर तुम्हीही पायी चढा अन् मग...; चंद्रकांत पाटलांचे आव्हान
admin

राज्यपाल शिवेनरीवर चालत गेलेत, हिम्मत असेल तर तुम्हीही पायी चढा अन् मग...; चंद्रकांत पाटलांचे आव्हान

राज्यपालांविरोधात विरोधकांकडून निदर्शने करण्यात येत आहे. तर, सत्ताधारी पक्षामधूनही राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांविरोधात विरोधकांकडून निदर्शने करण्यात येत आहे. तर, सत्ताधारी पक्षामधूनही राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल शिवेनरीवर चालत गेले, तुम्ही कधी गेला आहेत का चालत? हिम्मत असेल तर ते आधी पायी चढा आणि मग भक्ती दाखवा, असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.

राज्यपाल शिवेनरीवर चालत गेलेत, हिम्मत असेल तर तुम्हीही पायी चढा अन् मग...; चंद्रकांत पाटलांचे आव्हान
दिवार सिनेमाप्रमाणे शिंदे गटाच्या कपाळावर गद्दार लिहिलंय, त्यांच्या पोराबाळांना...; राऊतांचा घणाघात

चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना भूगोल कळतो का. रोज सकाळी उठायचे आणि भाषण करायची. आम्ही काही भूमिका मांडली की त्यांना प्रॉब्लेम आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, शिवराय यांचा अपमान कोणी करू शकत नाही. त्यांच्यामुळे आज आपण उभे आहेत. राज्यपाल शिवेनरीवर चालत गेले, तुम्ही कधी गेला आहेत का चालत? हिम्मत असेल तर ते आधी पायी चढा आणि मग भक्ती दाखवा, असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे. या वयात राज्यपाल शिवनेरीला पायी चालत गेले. त्यांच्या मनात महाराज यांच्याबद्दल काही असेलच ना. ज्या माणसाच्या मनात महाराजांच्या मनात आदर आहे, त्यांच्या एका वाक्याला एवढा का विरोध होत आहे, असे प्रश्न त्यांनी विचारला आहे.

राज्यपाल शिवेनरीवर चालत गेलेत, हिम्मत असेल तर तुम्हीही पायी चढा अन् मग...; चंद्रकांत पाटलांचे आव्हान
एवढा राग आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी...; उदयनराजेंना संताप अनावर

तर, राज्यपालांविरोधात छत्रपती उदयनराजे भोसले रायगडमध्ये आक्रोश आंदोलन करणार आहे. यावेळी एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात, अशा शब्दात उदयनराजे यांनी आपला राग व्यक्त केला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, उदयन राजे आमचे नेते आहेत. ज्या राज्यपालांनी पायी जाऊन दर्शन घेतले. त्यांच्याकडून काही बोललं गेले असेल तर त्यांना हाथ जोडून विनंती आहे की हा विषय संपवा, असे आवाहन चंद्रकांत पाटलांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com