...या स्टंप घेऊन आम्ही पण तयार; आशिष शेलारांचे उध्दव ठाकरेंना आव्हान

...या स्टंप घेऊन आम्ही पण तयार; आशिष शेलारांचे उध्दव ठाकरेंना आव्हान

आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी अज्ञातांनी हल्ला केला होता. मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहेर काढणार म्हणूनच त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा मनसेने केला होता. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते, असा निशाणा शेलारांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

...या स्टंप घेऊन आम्ही पण तयार; आशिष शेलारांचे उध्दव ठाकरेंना आव्हान
२७ जुलै हा 'देशद्रोही दिवस' ​​म्हणून घोषित करा; राणेंचा ठाकरेंवर प्रहार

आशिष शेलारांनी ट्विटरवरुन उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे "कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशेब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे, असा खोचक प्रश्नही शेलारांनी उध्दव ठाकरेंना विचारला आहे.

आम्ही तर रोज विचारणार. कोविड मध्ये "कफना"त पण "कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत, असे थेट आव्हानच शेलारांनी उध्दव ठाकरेंना दिले आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला प्रकरण आरोप पत्र दाखल झालेला आहे त्यामधील आरोपी अशोक खरात यांनी हे सगळे उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी केला आहे, असा खुलासा केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com