...हेच बेबी पेग्विंनचे उद्योग; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. अशातच शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली होती. यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील शिरूर आणि जुन्नर येथील शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी बसून संवाद साधला. यावर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, सत्ता असताना डीनोच्या खांद्यावर, सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर. हेच बेबी पेग्विंनचे उद्योग, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पाहणी दौरादरम्यान शिंदे-फडणवीस सरकारावर जोरदार हल्लाबोलही केला होता. आताचं जे घटनाबाह्य सरकार आहे. मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे ठेवलेलं आहे, आमच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही सरकार बनवलेलं आहे. गद्दारी तुम्ही जी आमच्या सोबत केली आहे, ती माझ्या शेतकऱ्यासोबत करू नका, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता.