संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा अन्यथा संयम सुटेल; बावनकुळेंचा इशारा

संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा अन्यथा संयम सुटेल; बावनकुळेंचा इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भाजपा रस्त्यावर उतरेल, असा इशाराच बावनकुळे यांनी राऊतांना दिला आहे.

संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा अन्यथा संयम सुटेल; बावनकुळेंचा इशारा
'...म्हणून संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा'

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांनी आव्हान देऊ नये, राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये, अन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असे संजय राऊत यांनी बोलू नये. मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर न्यायालयातच तोडगा निघेल. परंतु, या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातच तोडगा निघेल हे माहिती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वतः सीमाभागात जाणार असल्याचे जाहीर करणे शोभत नाही. त्यांना सीमाभागात जायचे होते तर ते आधी का गेले नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो, अशी टीकाही बावनकुळेंनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा अन्यथा संयम सुटेल; बावनकुळेंचा इशारा
दिल्ली महापालिकेमध्येही 'झाडू'; भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून 'आप'चा झेंडा

दरम्यान, जी २० संबंधी बैठकीस निमंत्रण असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या हितापेक्षा अधिक महत्त्व स्वतःच्या राजकारणाला दिले व महाराष्ट्राचा अपमान केला, असेही बावनकुळेंनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com