india vs pakistan | Asia Cup 2022
india vs pakistan | Asia Cup 2022 team lokshahi

आशिया कप 2022 IND vs PAK : जर रोहित शर्माने नाणेफेक जिंकली तर सामना जिंकलाचं समजा, कारण...

भारतीय संघ या पराभवाचा बदला नक्कीच घेणार
Published by :
Shubham Tate

Asia Cup 2022 IND vs PAK : आशिया चषक 2022 सुरू होण्यासाठी आता फक्त काही तास बाकी आहेत. आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. संपूर्ण जग या सामन्याची वाट पाहत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ या सामन्यासाठी तयारी करत आहे. T20 विश्वचषक 2021 नंतर सुमारे दहा महिन्यांनंतर हे संघ आमनेसामने आहेत. (asia cup 2022 ind vs pak if rohit sharma wins the toss t20i h2h cricket)

विशेष म्हणजे दहा महिन्यांपूर्वी ज्या मैदानावर पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा पराभव केला होता, त्याच मैदानावर म्हणजेच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामनाही होत आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी तुम्ही नाणेफेकीची भूमिकाही थोडं तपशिलात समजून घेतली पाहिजे, कारण ती खूप खास असणार आहे.

india vs pakistan | Asia Cup 2022
ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी पूर्ण, 12 सप्टेंबरला निकाल

धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने अधिक सामने जिंकलेत

खरे तर आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 8 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत. म्हणजेच टीम इंडियाचे वरचेवर पाकिस्तानचे पारडे जड आहे. पण टीम इंडियाने जे आठ मॅच जिंकल्या आहेत त्यात विशेष म्हणजे आठ पैकी टीम इंडियाने सहा वेळा बॅटिंग करून मॅच जिंकली आहे, तर भारतीय टीमने पहिली बॅटिंग केल्याचे फक्त दोन वेळा घडले आहे.

पाकिस्तानने पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, चार वेळा प्रथम फलंदाजी करताना सामना जिंकला आहे आणि केवळ एकदाच धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. म्हणजेच, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यावर विजयाची टक्केवारी जास्त आहे, तर धावांचा पाठलाग करताना एकदा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने अधिक सामने जिंकले आहेत. म्हणजेच 28 ऑगस्टला जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम नाणेफेकीसाठी येतील तेव्हा त्यांच्या मनात हे आकडे असतील आणि जो नाणेफेक जिंकेल, तो त्यानुसार निर्णय घेईल.

india vs pakistan | Asia Cup 2022
महिला आशिया कप 2022 चं वेळापत्रक जाणून घ्या

तसेच T20 हेड टू हेड भारत आणि पाकिस्तान जाणून घ्या

आता तुम्हाला हे देखील माहित असावे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेल्या टी-20 सामन्यांचे आकडे काय आहेत, कारण हा आशिया कप टी-20 फॉर्मेटवर खेळला जात आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, भारत आणि पाकिस्तान नऊ सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत, त्यापैकी सात वेळा भारत जिंकला आहे आणि पाकिस्तानने फक्त दोन वेळा विजय मिळवला आहे. या दोन सामन्यांमध्ये एक सामना सारखाच आहे, जो 2021 च्या विश्वचषकात खेळला गेला होता, तेव्हा टीम इंडियाचा दहा विकेट्सने पराभव झाला होता, या पराभवाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि यावेळी भारतीय संघ या पराभवाचा बदला नक्कीच घेईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com