Ranbir & Alia Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Kapoor : लग्नानंतर रणबीरने केला 'या' गोष्टीचा खुलासा...

रणबीर कपूरने आलिया भट्टसोबत लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बनले आहे हे सांगितले.

Published by : prashantpawar1

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhat) हे बॉलिवूडमधील सुंदर कपल्सपैकी एक आहे. प्रदीर्घ अफेअरनंतर दोघांनी 14 एप्रिल रोजी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या सर्व फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला अजूनही होत आहे. दोघांची प्रेमकहाणी त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली असं म्हटलं जातं. 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. आता रणबीरने लग्नानंतरच्या आयुष्यात झालेल्या बदलांची माहिती शेअर केली आहे.

एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने आलिया भट्टसोबत लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बनले आहे हे सांगितले. रणबीर कपूर म्हणाला सध्या तरी 'इतका मोठा बदल झालेला नाही. आम्ही लग्न करून घ्यावं असं वाटलं म्हणून आम्ही केलं. आमच्याही काही कमिटमेंट्स होत्या. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघेही कामावर पोहोचलो. आलिया तिच्या शूटसाठी निघाली होती आणि मी देखील मनालीला गेलो होतो. जेव्हा ती लंडनहून परत आलो आणि माझा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा आम्ही एका आठवड्याची सुट्टी घेण्याचा विचार करत आहोत. आम्ही विवाहित आहोत हे आम्हाला अजूनही वाटत नाही असं देखील रणबीर यावेळी म्हणाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test