Winter Health Tips
Winter Health Tips Team Lokshahi
लाईफ स्टाइल

हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये करा 'या' गोष्टींचा समावेश

Published by : shamal ghanekar

हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप आवश्यक असते. कारण बहुतेक लोक हिवाळ्यात आजारी पडतात. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक प्रकारच्या संक्रमणामुळे ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये डॉक्टरही आपल्या आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात उत्तम आहार आणि आरोग्यदायी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. तर या लेखातून आपण हिवाळ्यात कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सांगणार आहोत.

शरीर निरोगी आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच दररोज व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी निरोगी आहार करणे खूप आवश्यक आहे. तसेच फळे, भाज्या यांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ईची गरज असते. हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सीची गरज असते. त्यामुळे मोसंबी, लिंबू, किवी, पपई आणि पेरू यांसारखी फळे खाऊ शकता.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला चांगली झोप होणे गरजेचे असते. पुरेशी झोप मिळाल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा मोबाईल, टॅब किंवा इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहेत. हिवाळ्यामध्ये हळद आणि दालचिनी दुधात मिसळून घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा चमकदार होण्यासाठी मदत करते.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन केले जाते. बदाम, पिस्ता, काजू आणि अक्रोड यांसारख्या सर्व ड्रायफ्रुटसमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम यांसारखे घटक असतात. जे आपल्यासाठी फायदेशीर असते.

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...