Dinvishesh
Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : सिमला परिषदेच्या मसुदा तयार

Published by : Team Lokshahi

सुविचार

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

आज काय घडले

  • १९७२ मध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध समाप्तीनंतर सिमला परिषदेचा मसुदा तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला.

  • १९९७ मध्ये माइक टायसन यांनी मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावा घेऊन तुकडा तोडला. यामुळे त्यांना निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.

  • १९९८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने १९४८ साली मानवी संरक्षणासाठी घेतलेल्या मानवी हक्काविषयी सार्वत्रिक जाहीरनाम्यास पन्नास वर्ष पूर्ण झाली.

आज यांचा जन्म

  • भारताचे ९वे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा १९२१ मध्ये जन्म झाला. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान कारकिर्दीत झाली.

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, कलासमीक्षक बाबुराव नारायण सडवेलकर यांचा १९२८ मध्ये जन्म झाला.

  • साहित्यिक समीक्षक, दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा १९३७ मध्ये जन्म झाला. त्यांनी अनेक कवी-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.

  • पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित नेमबाज जसपाल राणा यांचा १९७६ मध्ये जन्म झाला. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ६०० पेक्षा जास्त पदक जिंकले आहेत.

आज यांची पुण्यतिथी

  • प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे १९७२ मध्ये निधन झाले.

  • उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे २००० मध्ये निधन झाले.

  • भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे २००९ मध्ये निधन झाले.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल