महाराष्ट्र

धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने हवेत गोळीबार

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे. अशातच, इंदापूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

इंदापूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे. अशातच, इंदापूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या कारणातून दोघांनी हवेत गोळीबार केल्याचे समजच आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन काझडमधील राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या कारणातून आणि गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुल आणि समीर यांनी शिवीगाळ करून हवेत गोळीबार केला आहे. सोमवारी इंदापूर तालुक्यातील काझड गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले होते. चौकशी अंती वालचंदनगर पोलिसांनी दोघांवरती गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा