महाराष्ट्र

धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने हवेत गोळीबार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

इंदापूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे. अशातच, इंदापूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या कारणातून दोघांनी हवेत गोळीबार केल्याचे समजच आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन काझडमधील राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या कारणातून आणि गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुल आणि समीर यांनी शिवीगाळ करून हवेत गोळीबार केला आहे. सोमवारी इंदापूर तालुक्यातील काझड गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले होते. चौकशी अंती वालचंदनगर पोलिसांनी दोघांवरती गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

Chicken Momos Recipe: घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीत बनवा चटपटीत चिकन मोमोज; जाणून घ्या रेसिपी...

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्यासाठी मोठी घोषणा, भारताने टॉप-४ मध्ये प्रवेश केल्यास 'या' ठिकाणी रंगणार सामना

Sambhajinagar च्या पाणी प्रश्नावरून न्यायाधीश उतरले रस्त्यावर

Sanjay Raut: 'मोदींनी शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान केलाय' मोदींच्या जिरेटोपावरुन राऊतांचा हल्लाबोल

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...