महाराष्ट्र

पश्चिम विदर्भाला अखेर न्याय मिळाला!

Published by : Lokshahi News

सुरज दाहाट, अमरावती
ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान भरपाई म्हणून मंगळवारी महाविकास आघाडी सरकारने 2860 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, यामध्ये विदर्भातील केवळ दोन जिल्ह्यांचा समावेश केला गेला होता तर अमरावती विभाग म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र या नुकसान भरपाई यादीतून वगळण्यात आला होता. यामुळे सर्वत्र असंतोष शेतकऱ्यांमध्ये दिसून आलेला होता.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडे मागणी केली, त्यामुळे गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा राज्य सरकारने नव्याने अधिसूचना जारी केली. यामध्ये राज्याच्या 9 जिल्ह्यासाठी मदत जाहीर केली आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यासाठी 162 कोटी 44 लाख 5 हजार रुपयांची मदत जाहीर केल्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.

अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी 514कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र यापैकी 162 कोटी 44 लाख 5 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. यात अमरावती जिल्हासाठी 5212.39 कोटी, अकोला 118.97, यवतमाळ 5664,00, बुलढाणा 4267 व वाशिम जिल्हासाठी 981 कोटी 12 लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे, मात्र ही मदत दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजे ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या