महाराष्ट्र

हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

Published by : Lokshahi News

गजानन वाणी | हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग असून जिल्ह्यात मागील 24 तासात 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात 20 मंडळात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आहे.अनके पुलावरून पाणी जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील पूर्णा कयाधू नदीला पूर आला असून नदी परिसरातील शेकडो हेक्टर जमिनी पाण्याखाली घेल्याने शेती पिकाच मोठं नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडले आहेत. हिंगोली तालुक्यात 73 मिलिमीटर पडला तर सर्वात जास्त कळमनुरी तालुक्यात 81 मिलिमीटर पाऊस झालाय.

दोघांचा बळी एक बेपत्ता

दरम्यान जिल्ह्यात तीन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे दोन जणांचा बळी गेलाय तर आज सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथील 35 वर्षीय शेतकरी उद्धव काळे हे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले असता पूर्णा नदी पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे मात्र 24 तास उलटूनही शेतकऱ्याचा शोध लागला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jodha Akbar Rajat Tokas : छोट्या पडद्यावरील 'अकबर' एक वर्षापासून बेपत्ता! 'त्या' दुर्घटनेनंतर सगळ्यांशी तोडला संबंध, नेमकं प्रकरण काय?

Rahul Gandhi : चंद्रपूरच्या राजुऱ्यातही मतचोरी? राहूल गांधींचा दावा, भाजपाने फेटाळला आरोप

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली