महाराष्ट्र

फक्त तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या; पोलिसांनी 24 तासात लावला छडा

पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : आयटी इंजिनियरची फक्त तीन हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे. गौरव सुरेश उदाशी (वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर, टॅक्सी चालक भगवान केंद्रे आणि अमोल मानकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माहितीनुसार, वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी गौरवचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. तसेच, घटनास्थळी त्याची दुचाकी सापडली होती. दुचाकीवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. शुक्रवारी रात्री गौरव जेवायला जातो सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींना परतापुर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. गौरवने 3 हजार परत न दिल्याने आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने गौरवचा खून केला. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा