महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या

वैभव कदम यांची अनंत करमुसे प्रकरणात सुरु होती चौकशी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे माजी सुरक्षा रक्षक वैभव कदम यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेले काही दिवसांपासून करमुसे मारहाण प्रकरणात त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळेच ते प्रचंड तणावाखाली होते. यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरु आहेत. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

वैभव कदम अनंत करमुसे प्रकरणाच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड होते. याप्रकरणी त्यांनाही आरोपी बनविण्यात आले असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु होती. यादरम्यान, त्यांची मानसिक स्थिती कशी होती हे त्यांनी ठेवलेल्या फेसबुक आणि व्हाट्सप स्टेटसवरून समोर आलं. त्यांनी ठेवलेल्या त्यांच्या शेवटच्या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलंय पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे मी आरोपी नाही आहे, असे त्यांनी म्हंटले होते. त्यामुळे तणावाखाली त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. परंतु, अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या माहितीनुसार, वैभव कदम हे आज सकाळी निळजे तळोजा येथे जखमी अवस्थेमध्ये सापडले. तेथून दिवा येथे त्यांना उपचारासाठी नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. वैभव कदम यांना ठाणे लोहमार्ग पोलीस यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात घेऊन आले आहेत. ठाणे लोहमार्ग आणि ठाणे शहर पोलीस यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

नेमके काय आहे अनंत करमुसे प्रकरण?

फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू