राजकारण

गुजरातला दोन मुख्यमंत्री, एक तिकडे आणि एक इकडे बसलेत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आज महाराष्ट्र दिन आहे, गुजरातचा पण दिन आहे. त्यांना शुभेच्छा. केंद्राकडून महाराष्ट्राला दुय्यम वागणूक दिली जातेय, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली आहे. गुजरातचे दोन मुख्यमंत्री एक तिकडचे आणि एक इकडे बसलेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. वज्रमुठ सभेच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे स्वागतपर भाषण केले. यावेळी ते बोलत होते.

आज महाराष्ट्र दिन आहे, गुजरातचा पण दिन आहे. त्यांना शुभेच्छा. पण, गुजरातचे काय भाग्य आहे बघा. केंद्र सरकार जे काही देतंय ते गुजरातला देतंय. महाराष्ट्राला दुय्यम वागणूक दिली जातेय. गुजरातचे दोन मुख्यमंत्री एक तिकडचे आणि एक इकडे बसलेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न दिल्लीत होत आहे. पण हा महाराष्ट्र आहे. हा तुम्हाला वाकवेल पण झुकणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

गेल्या 8-10 महिन्यात महाराष्ट्र अंधारात गेला आहे. या अंधारातून आपल्याला महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे. कोरोना काळातही आमच्या सरकारमध्ये लाखोंची गुंतवणूक आणली. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा, बाळासाहेब थोरात आणि सर्व मविआच्या नेते काम करत होते. या सरकारमध्ये मुंबईचे कोणी मंत्री नाहीत. स्क्वेअर फूट विकणारे आहेत पण इंच इंच जाणणारे नाहीत. हे घटनाबाह्य सरकार जाणार म्हणजे जाणारच, असे पुर्नच्चार त्यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू