राजकारण

ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर अंबादास दानवेंनी मानले फडणवीस यांचे आभार

अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपामुळेच शिवसेनेचा विजय झाल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल नांदुरकर | अकोला : अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे. यावरुन मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. भाजपामुळेच शिवसेनेचा विजय झाल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. अशातच, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा मोठा विजय झाला. यावर भाजपकडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यातच आता भाजप नेत्यांकडून या विजयानंतर फडणवीसांचे आभार मानावे, असे वक्तव्य करण्यात येत आहेत. याला प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिले आहे. ते म्हणाले की, खरोखरच फडणवीसांचे आभार आम्ही मानलेच पाहिजे की त्यांनी आमचं चिन्ह, आमच्या पार्टीचे नाव गोठवलं. नोटांचे मताधिक्य ईव्हीएममध्ये वाढवलं. खरोखरच त्यांचा आम्हाला संपवण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला, असा खोचक टोला दानवेंनी लगावला आहे.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय. ऋतुजाताईंचे अभिनंदन. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता, असे त्यांनी म्हंटले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय