राजकारण

मंत्रिमंडळ विस्तार लवकर केलं पाहिजे नाहीतर...; बच्चू कडूंचे मोठे विधान

शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूूरज दहाट | अमरावती : शिवसेनेतील 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदेंनी ही बंडखोरी केली होती. राजकीय घडामोडीनंतर राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. आज या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येतं आहे. अशातच, मंत्रिमंडळ विस्तार जुलैमध्ये होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

मंत्रिमंडळ विस्तार लवकर करून मोकळं केलं पाहिजे नाही तर सांगून द्या २०२४मध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल. एका एका मंत्र्यांकडे 8 खाते आहेत कामे होत नाही फाईली अडकून पडल्या आहेत. पालकमंत्री असते तर प्रशासनावर वचक राहते, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.

तर, देवेंद्र फडणवीस शिंदे गटातील नेत्यांवर नाराज असल्याचे चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, फडणवीस शिंदे गटाच्या मंत्र्यांवर नाराज नाही. त्यांच्या हातातच सगळं आहे. चांगले मंत्री असेल तर राहील अन्यथा त्यांना डच्चू मिळेल, असे त्यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : गणपती विसर्जनात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकत्र थिरकले; पाहा Viral Video

Donald Trump On Narendra Modi : "ते महान आहेत मात्र...यामुळे ते मला पसंत नाही", टॅरिफवरुन बिघडलेल्या संबंधांनंतर ट्रम्प यांचे मोठं विधान

Chinchpoklicha Chintamani Visarjan : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ; गणेशभक्तांचा जल्लोष

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk : पालखी निघाली राजाची! मंडपातून बाहेर पडला राजा अन्... लालबागच्या राजाचा मुख्यप्रवेशद्वारा बाहेर थाट