राजकारण

Raj Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रिपद? राज ठाकरेंचा मोठा खुलासा

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचे सरकार स्थापन झाले. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्यात नेमकं कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेण्याची ऑफर भाजपानं दिल्याची बातमी समोर आली. मात्र त्यावर आता खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खुलासा केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, ही बातमी धांदात खोटी असून खोडसाळ आहे. तसंच कोणीतरी जाणुनबुजून राजकीय वातावरण निर्माण कऱण्यासाठी आमच्या नावांचा वापर करत असल्याचंही म्हटलं आहे. राज ठाकरेंनी हे वृत्त पसरवणाऱ्यांवर नाराजीदेखील जाहीर केली आहे.

राज्यात सत्तांतर घडत असताना मनसेच्या एकमेव आमदाराने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने विधानसभेत मतदान केले होते. तेव्हापासून मनसे राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होईल अशी चर्चा सुरू झाली. मनसेला २ मंत्री पदे दिली जातील असे बोलले गेले. परंतु त्यावर मनसेने कुठलेही भाष्य केले नाही. मात्र आता अमित ठाकरेंचे नाव पुढे आल्यानंतर याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही आहेत अशी चर्चा सुरू होती. बुधवारी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची भेट घेणार होते. परंतु काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता अमित ठाकरेंच्या चर्चेबाबत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजपानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी