Chanadrashekhar Bawankule  Team Lokshahi
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष- बावनकुळे

शिंदे आणि भाजप युतीला राज्यातील जनतेचा स्पष्ट कौल चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना अशातच आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. या विजयानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला स्पष्ट कौल दिला आहे. असे विधान यावेळी बावनकुळे यांनी केले.

आज नागपूर येथे पत्रकारांना बोलत असताना बावनकुळे म्हणाले की, "राज्यात मतदान झालेल्या ग्रामपंचायतींपैकी 581 च्या निकालाची माहिती उपलब्ध झाली असून भारतीय जनता पार्टीचे सरपंच 259 ठिकाणी निवडून आले आहेत.

या निवडणुकीतही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे सरपंच 40 ठिकाणी निवडून आले आहेत.म्हणूनच शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळात थेट जनतेमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचे जनतेने संपूर्णपणे स्वागत केले आहे. दोन्हीचा एकत्रित विचार करता पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच लोकांनी निवडून दिले आहेत. या कौलाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो." अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...