Amit Shah | Satyapal Malik Team Lokshahi
राजकारण

मलिकांच्या आरोपांवर अमित शाहांची पलटवार; म्हणाले, जनतेने आणि...

पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहायला सांगितले.

Published by : Sagar Pradhan

राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे. हे सर्व सुरू असताना काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होता. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, यावरच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले अमित शाह मलिकांच्या आरोपांवर?

इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, 'मलिकांना राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतरच या गोष्टी का आठवत आहेत? त्यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर राज्यपाल पदावर असताना ते या विषयावर का बोलले नाहीत? याचा विचार आता जनतेने आणि माध्यमांनी करावा. खरं तर लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा अनेकदा त्यांचा विवेक जागा होत नाही' अशी बाजू त्यांनी यावेळी मांडली.

काय केले होते मलिकांनी आरोप?

‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले होते की, पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहायला सांगितले. गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला. अजित डोवाल यांनीही याबाबत मला गप्प राहण्यास सांगत या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा निवडणुकीत होईल. असं त्यांनी सांगितले असल्याचे मलिक म्हणाले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा