राजकारण

'आफताबला आमच्या ताब्यात द्या, त्याचे 100 तुकडे करायला मनसे सज्ज'

दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. वसईतील श्रध्दा वालकर तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. वसईतील श्रध्दा वालकर तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आफताबबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे.

मनोज चव्हाण म्हणाले की, खुनी अफताब हा महाराष्ट्राचा गुन्हेगार आहे. त्याला आमच्या ताब्यात द्या. त्याचे 100 तुकडे करण्यास मनसे सज्ज आहे. उद्या कोणी वकील त्याच्या जामीनाचा अर्ज करणार. अस करण्यापेक्षा हे कायदे बदलण गरजेचे आहे. जसे रांझे पाटलांनी स्त्रीवर अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकडे करुन त्याचा चौरंग केला. असाच कायदा देशात अंमलात आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण?

मुळची वसईतील श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू