राजकारण

'आफताबला आमच्या ताब्यात द्या, त्याचे 100 तुकडे करायला मनसे सज्ज'

दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. वसईतील श्रध्दा वालकर तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. वसईतील श्रध्दा वालकर तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आफताबबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे.

मनोज चव्हाण म्हणाले की, खुनी अफताब हा महाराष्ट्राचा गुन्हेगार आहे. त्याला आमच्या ताब्यात द्या. त्याचे 100 तुकडे करण्यास मनसे सज्ज आहे. उद्या कोणी वकील त्याच्या जामीनाचा अर्ज करणार. अस करण्यापेक्षा हे कायदे बदलण गरजेचे आहे. जसे रांझे पाटलांनी स्त्रीवर अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकडे करुन त्याचा चौरंग केला. असाच कायदा देशात अंमलात आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण?

मुळची वसईतील श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा