राजकारण

जाहिरात प्रकरणात रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना खेचले; म्हणाले...

जाहिरातीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना रामदास कदम यांनी प्रत्त्युत्तर देताना उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

निस्सार शेख | रत्नागिरी : सलग दोन दिवस प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिरातीवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेला शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात सर्वात अधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आणि तरीही उद्धव ठाकरे यांचा लोकप्रियतेत 1 नंबर आला म्हणून जाहिराती छापल्या गेल्या. त्यावेळी हे प्रश्न का उपस्थित करण्यात आले नाहीत? असा उलट सवाल रामदास कदम यांनी विरोधकांना केला आहे.

तसेच शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेत आहेत. त्यामुळेच विरोधकांना पोटदुखी झाली असून लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून टीका करून शिंदे-फडणवीस यांच्यात फुट पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. ते हास्यास्पद असल्याची टीकाही कदम यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड