राजकारण

भाजपाच्या आराध्य दैवतांकडून शिवरायांचा अपमान, किती वेळ हात चोळत बसणार : संजय राऊत

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसवर निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन राजकीय वातावरण चांगलेत तापले असून आंदोलनाचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. अशातच संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. आणि ज्या पध्दतीने त्यांचा सातत्याने अपमान भाजपच्या आराध्य दैवतांकडून होत आहे. त्यांना वाटत असेल जसे राजकारण चालू आहे. त्या पध्दतीने आम्ही हाही विषय बाजूला करु. महाराष्ट्रवर जो अन्याय होत आहे. त्याविषयी विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. अ‍ॅ क्शन प्लॅन तयार आहे. त्यासंदर्भात व्यवस्थित हालचालीही सुरु आहेत. आम्ही वाट बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घणघोर अपमान होऊनही सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ व आमदार हे हात चोळत कसे बसलेत. स्वाभिमानाचे कारण देत पक्ष सोडून गेलेले आता तोंड शिवून हे आम्ही राज्याला दाखवतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर हे सरकार मुठी आवळून उभे राहत नाहीयेत. याच लोकांनी शिवसेना फोडली कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. याविरोधात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी पावले उचलायची आहेत ते उचलत आहोत. तसेच, रविवारी छत्रपती संभाजीराजे व उदयनराजे यांनी जी भावना घेतली. ती लोकभावना आहे. भाजपचे हे ठगे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करुन पुन्हा महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत. हे महाराष्ट्र पाहतोय. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

पंडित नेहरुंवरीलही चिखलफेक थांबवा. पंडित नेहरु होतो म्हणून हा देश पुढे गेला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेले आहे. देशाच्या विकासात योगदान दिलेले आहे. अशा देशातल्या कोणत्याही महान नेत्याचा अपमान होऊ नये, असे त्यांनी म्हंटले आहे. एवढचे प्रेम आहे तर वीर सावरकारांना भारतरत्न द्या. इंडिया गेटजवळ नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारलेला आहे. त्यांच्या बाजूला वीर सावरकरांचा पुतळा का उभारला नाही. सावरकारांचा पुतळा उभारा आम्ही स्वागताला येतो. पण, त्यांना केवळ वीर सावरकरांच्या नावाने राजकारण करायचे आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड