राजकारण

उद्धव ठाकरेंवर जसा परिणाम झालाय तसाच रोहित पवारांवर; कोणी केली टीका?

दहा-बारा दिवसात गेलेले आमदार परत येतील, तुम्हाला चित्र वेगळे दिसेल, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदनगर : दहा-बारा दिवसात गेलेले आमदार परत येतील, तुम्हाला चित्र वेगळे दिसेल, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं. त्यावरून भाजप नेते सुजय विखे यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंवर जसा परिणाम झालाय तसाच रोहित पवारांवर झाला आहे, असा निशाणा सुजय विखेंनी साधला आहे. जी काय परिस्थिती निर्माण झाली त्यात त्यांचाही मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच, लोकसभा निवडणुकीत होऊन जाईन मात्र आमदार परत जाणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे.

ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे या राजकारणात तरुणांनी यावा की नाही, असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलं होतं. त्यावरून सुजय विखे यांनी टोला लागलाय. आधी ते राजकारण सोडणार का याची भूमिका त्यांनी जाहीर करावी, असं अहवान त्यांनी केला आहे.

तसेच रोहित पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली होती, त्यावरून देखील सुजय विखे यांनी निशाणा साधला आहे. जेवढा आमचं वय नाही तेवढे त्यांचे राजकारण झालं असून त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा पक्षावर टीका करावी. कोणाला काय दिलं काही नाही यावर बोलू नये. तर ते का गेले याचा विचार करावा अस सुजय विखे यांनी म्हटलंय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा