राजकारण

राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मानहानीप्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मानहानीप्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. याविरोधात विरोधक आक्रमक झाले असून मोदी सरकारविरोधात टीका करत आहेत. असातच, उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

काय म्हणाले उध्दव ठाकरे?

चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी अखेर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chitra Wagh On Pune Crime : राज्यात महिला अत्याचारात वाढ; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष