Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

औरंगाबाद अन् उस्मानाबादच्या नामांतर मंजुरीनंतर उध्दव ठाकरेंनी मानले सरकारचे आभार; म्हणाले, याबद्दल...

आम्ही जो नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय घेतला होता, त्याला स्थगिती दिली नाही. याबद्दल धन्यवाद देतो.

Published by : Sagar Pradhan

अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यानंतर आज केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. यावरच आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावरच आता ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केले

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केले, त्यानंतर आज या मंजुरी मिळालेली आहे. परंतु सध्याच्या राज्य सरकारला एवढ्या पुरते धन्यवाद देतो की, इतर अनेक निर्णयांनी त्यांनी स्थगिती दिली होती, मात्र आम्ही जो नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय घेतला होता, त्याला स्थगिती दिली नाही. याबद्दल धन्यवाद देतो.

पुढे ते म्हणाले की, तो क्षण आठवतोय, माझी शेवटची कॅबिनेट बैठक होती. ज्यावेळी शेवटी हे दोन्ही प्रस्ताव आले, ते प्रस्ताव मांडल्याबरोबर मित्रपक्षांचे मंत्रिमंडळातील जे सदस्य होते, त्यांनी होकार दिला. कोणीही शंका कुशंका काढली नाही. जे नामांतर यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी करू म्हंटल होते, पण त्यांना करता आले नाही. मात्र ते आम्ही करू शकलो, याचा मला अभिमान आहे, असे उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं