uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती? ठाकरेंचा भाजपला सवाल

भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी, माझा कारभार वाईट असेल तर मला जनता प्रश्न विचारेल. बंडखोरांचा मालिक एकच आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. त्यानंतर आता राष्ट्रवादीतही दोन गट तयार झाले. हा सर्व राजकीय गोंधळ सुरू असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी आजच्या यवतमाळ येथील सभेत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाल उद्धव ठाकरे?

यवतमाळ येथे भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपला अजून भाजप पक्ष झाला नाही. भाजपचा आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर होते यांनी मेहनत करुन भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे. भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी, माझा कारभार वाईट असेल तर मला जनता प्रश्न विचारेल. बंडखोरांचा मालिक एकच आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे. आता राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती, असा सवाल करत त्यांनी भाजपवर टीका केली.

पुढे ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे लोकांच्या मनात आहेत. त्यांना कोणीही काढू शकत नाही. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत. राज्यात आता फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. आधी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं आता खोक्यातून सरकार जन्माला येत. असा खोचक टोला त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...